गणेशोत्सव २०१०
खास महिला पथकाच्या ‘’लेझीमच्या” गजरात आणि ''गणपती बाप्पा मोरया'' च्या घोषात १८ सप्टेंबर २०१० रोजी यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि जल्लोषात केपन ऑडिटोरियम मधे साजरा झाला .
सूत्रसंचालक अनिरुद्ध गोडबोले यांनी उपस्थितांचे स्वागत केले .
श्री . सुदर्शन व सौ . पूनम पलांडे यांनी गणपतीची प्रतिष्ठापना व पूजा केली .
कार्यक्रमाचे मनोरंजनात्मक सूत्रसंचालन अनिरुद्ध गोडबोले, मंदार कुलकर्णी, सुदर्शन पलांडे, आशिष डहाके आणि धीरज कुटे यांनी केले होते .
यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ म्हणजे आजीआजोबांपासून ते नातवंडापर्यंत असे सर्व वयोगटातील कलाकार सहभागी झाले होते .
कार्यक्रमाची सुरुवात राधा व मीरा वाघ यांच्या ‘’गणेशस्तोत्रापासून” झाली . त्यानंतर श्रीया मालपाणी व गार्गी खेर यांनी सुरेख नृत्या्विष्कारातून ''गणेशवंदना'' सादर केली . ऋजुता दुर्वासने व अन्विता लिमये या दोघींनी साभिनय सादर केल्या ''बालकविता''
निळूभाऊ म्हणजेच मंदार कुलकर्णी यांनी निवेदनात आपल्या विनोदी शैलीने ‘’राजकारण” हा सर्वांचा आवडता विषय हाताळला .
यानंतर रिषभ चलम याने "शूर आम्ही सरदार.. " गीत जोषात सादर करून प्रेक्षकांना खुष केले . तेच सुरेल वातावरण कायम ठेवत सुहृद राउत ने उत्कृष्ठ ‘’पिआनो” वादन केले .
''उठा राष्ट्रवीर हो'' हे राष्ट्र्भक्तीपर समूहगान सादर केले रिषभ चलम, अलिशा नाडकर्णी , अक्षय बुचे आणि सानिका बुचे यांनी .
यानंतर अंशुमन थोरवे, आयुश पाटील , सोहम मेहता, यश कुलकर्णी आणि रोनक पोतनीस या चिमुकल्यांनी 'जय हनुमान' म्हणत गदा फिरवत मस्त नाच सादर केला .
पुढे चिरांत मूर्ती, स्वरा केतकर, तन्वी मून, नित्या शहा,, दिया पाटील, ईशा खांडेकर यांनी खास कोकणी बाजात '' बाल्या नाच '' सादर केला .
यानंतरचा सुरेख ''बलून डान्स'' सादर केला अन्विता लिमये , सोनाल गानू , पुर्वा साठे , अनन्या बसरकर, अथर्व भावे, मृणांक पांडा, केसिया फर्नांडीस, सिद्धी हिंदुराव या चमुनी .
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सादर झाला खास मराठ्मोळ्या सणांचा '' जल्लोष”. सर्व बालकलाकारांनी परिश्रम पूर्वक नृत्य, संगीत, पूरक सजावट आणि अभिनया द्वारे प्रत्येक सण रंगमंचावर उत्कृष्ठरित्या उभा केला . सुरुवात झाली चैत्रातल्या पाडव्याने…
“पाडवा” सण सादर केला ग्रीष्मा राउत , देवकी कस्तुरे, चिन्मय शेंडे, अथर्व सरदेसाई, निहीर सरदेसाई, आणि सौ . विजयाताई शेंडे यांनी .
“आषाढी एकादशीची” हुबेहूब दिंडी सादर केली अनिश देशपांडे , ललित मोरे , आदिती किशोर, श्रेया मोकाशी, अथर्व पेडणेकर , अनमोल कर्णिक, चैत्राली मोरे , सिद्धी गोखले , ओजस डहाळकर आणि कौशल धुमाळ .
गोविंदा रे गोपाळा अर्थात ''दहीहंडी'' आणि ''गणपतीचा'' सण सादर केला अक्षय बुचे , सानिका बुचे , गार्गी खेर , तेजस इदाते , श्रीया मालपाणी , मंत्र दवे, सुहृद राउत , रिषभ चलम , अलिशा नाडकर्णी , वेद लोंबर , ईशान नेरुरकर , अर्जुन काळे , ऋचा खेर , अभिरू राउत .
यानंतर ‘’नवरात्र” आणि ‘’दसरा” सण , राधा वाघ , आर्य ठोंबरे , अनुष्का लिमये , प्रिया जोशी , ऋजुता दुर्वास , मीरा वाघ, मौशमी भट या बालकलाकारांनी आणि श्री गोविंद कुलकर्णी व श्रीमती अनुराधाताई कुलकर्णी या आजीआजोबांनी सादर केला .
सणांचा राजा असलेला सण म्हणजे ''दिवाळी'' . हा सण धूमधडाक्यात सादर केला अनुषा नाडकर्णी , जय महाजन , वैदही पाटील , नरेन देसाई , आर्या खापरे , सोहन पागनीस , रिया गुर्जर , चिराग बावीसकर , अवनी खापरे, विरेन देसाई , देवदत्त कस्तुरे, देवकी कस्तुरे , या बालकलाकारांनी आणि श्रीमती रुपालीताई कुलकर्णी , श्रीमती अंजलीताई पारसनीस यांनी .
तिळगुळ घ्या गोड बोला अर्थात ''मकरसंक्रांत'' हा सण सादर केला बालकलाकार अंशुमन थोरवे , आयुष पाटील , सोहम मेहता , यश कुलकर्णी , रोनक पोतनीस , कुशल बिहानी यांना साथ केली होती मुलांच्या आईंनी म्हणजेच शिल्पा पोतनीस अश्विनी पाटील , नम्रता कुलकर्णी , गायत्री बिहानी , पुष्पा थोरवे , रोहिणी मेहता यांनी
आपल्या मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे ''होळी'' सादर केला या बालकलाकारांनी राधा वाघ , आर्य ठोंबरे , अनुष्का लिमये , प्रिया जोशी , ऋजुता दुर्वास , मीरा वाघ, मौसमी भट , अनुषा नाडकर्णी , जय महाजन , वैदही पाटील , नरेन देसाई, आर्या खापरे , सोहन पागनीस, रिया गुर्जर, चिराग बावीसकर, अवनी खापरे,
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ".... या अभिमान गीताचा प्रत्यक्ष अनुभव देत “जल्लोष” चा समारोप झाला महाराष्ट्रगीताने .
बालकलाकारांच्या महाराष्ट्रागीतानंतर मोठ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली .
मायदेशीच्या आप्तस्वकियांची आठवण करून देणारी एक कविता सौ विजयाताई शेंडे यांनी सादर केली .
आपल्या निवेदन कौशल्याने 'ह' च्या भाषेत बोलून अनिरुद्ध गोडबोले आणि त्याला उत्तरे देत सुदर्शन पलांडे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली .
आपल्या सुमधुर आवाजात राजेश चलम यांनी ''ओंकार स्वरूपा'' तर गायिका गौरी सरदेसाई यांनी "गजानना श्रीगणराया " सादर करून कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुरेल रंग भरला .
राजेश चलम यांच्या '' मन उधाण वाऱ्याचे'' "राधा ही बावरी " या गाण्यांना प्रेक्षाकांनी मनापासून जोरदार दाद दिली . त्यानंतर अत्यंत श्रवणीय भैरवी सादर करुन गौरी सरदेसाई यांनी कार्यक्रमाची सुरेल आणी भावपूर्ण सांगता केली ..
यानंतर धीरज कुटे यांनी आपल्या मिमिक्री मधून उत्कृष्ट अभिनयाचा नमुना सादर केला व उपस्थितांची मने जिंकून त्यांना नृत्यांच्या विश्वात नेऊन ठेवले .
वन्समोअर घेणारी मोठ्यांची दोन दणदणीत नृत्ये सादर झाली .
''अप्सरा आली '' आणि ''वाजले कि बारा'' या गीतांवर ठसकेबाज लावणी नृत्य सादर केले श्वेताश्री मुखर्जी, सीमा मोटवानी , पायल अगरवाल, अनन्या रोटकर .
कार्यक्रमाच्या उतारार्धात आशिष डहाके आणि सुदर्शनच्या रंगतदार निवेदनानंतर एक दर्जेदार कलाविष्कार '' मोरया मोरया'' नृत्य सादर केले श्रेया देसाई, निहारिका पाध्य कुलकर्णी , सोनाली डहाळकर , अनुराधा गोडबोले , रश्मी गोखले , तृप्ती शिंपी , कुलदीप शर्मा , अनंत गोखले , रोहित मनुजा , साईयेश प्रकाश , राहुल कुलकर्णी, अमलराज. या नृत्यासाठी विशेष सहाय्य केले निवेदिता कुलकर्णी, शिल्पा खापरे, बेलिंडा फर्नांडीस यांनी .
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर झाली आरती आणि अथर्वशिर्ष .
शेवटी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अनिरुद्ध गोडबोले यांनी सर्वांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली . त्यानंतर सर्वांनी फूडस्टॉल्सच्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेतला .
यावर्षीच्या कार्यक्रमाचे स्वयंसेवक होते .
कार्यस्थळ व्यवस्था गौरी करंदीकर, योगेश सावंत, मनिष लिमये, नैनेश गानू, अभी शेंडे, नितीन महाजन, उदय परांजपे
ध्वनी योजना मोहित पोतनीस
सजावट उत्तम नाईक, ह्रितिका नाईक, आशिष गोडबोले
सर्टिफ़िकेट डिझाईन चेतना शेंडे
भोजन व्यवस्था योगेश सावंत, सचिन बुचे, अभि शेंडे
तिकिटविक्री अनंत गोखले, सुदर्शन पलांडे, मोहीत पोतनीस, निवेदीता कुलकर्णी, अभिजीत नेरुरकर, नितीन महाजन
फोटोग्राफी रोहन गुर्जर
माव्याचे मोदक रुपालीताई कुलकर्णी, रश्मी गोखले, गौरी करंदीकर, अनुराधा गोडबोले
विशेष सहाय्य मीनल गुर्जर, सोनाली डहाळकर
रश्मी गोखले
कार्यक्रमाची छायाचित्रे
सकाळ मधील बातमी
कार्यक्रमांच्या वृत्तांतासाठी वर्ष निवडाः
२०२३
२०२२
२०२१
२०२०
२०१९
२०१८
२०१७
२०१६
२०१५
२०१४
२०१३
२०१२
२०११
२०१०
२००९
२००८
२००७
२००६
२००५
२००४
२००३
२००२
२००१
२०००